आजही
हवहवसं असतं ते बालपण
आठवे
ते बालपण माझे ....आयुष्याच्या याही उंबरठयावर ,,,,,..... !
राजा-राणीची
गाथा ऐकवी आगळी वेगळी
आजोबांची
बोली ह्रदयाला भेदीत्या वृक्ष कडूनिंबाची छाया आठवी
घराच्या मागच्या उंबरठयावर
तासन् तास बसूनि मैत्रीसंगी
थट्टा मस्तीचे ते बोलं,
तो गारव्याचा स्पर्श हळूवार स्मरती जीवाला
मिठूराज कमाल दाखवी
मिठू-मिठू बोल बोलून
मधुरस ओथंबत, माझ्याशी संवाद घालीत
जीवाशिवाची जडली मैत्री जणु
नात्यांनी बाधंली गाठ
मोठेपणाचा हा दृष्टपणा
न मानवे आज
मिळेल का पून्हा ते क्षण
मागते मन माझे , वारंवार ...
-- - ज्योती